आदित्यच्या लावारिस लोकांना वाटतंय सोशल मीडियावर बिहार विरुद्ध महाराष्ट्र वाद लावला की आदित्य सुटेल. विषय कुठल्या राज्याचा नाहीये विषय एका क्राईमचा आहे. असे म्हणत आदित्य ठाकरेंची बाजू सोशल मीडियावर लावून धरणाऱ्या समर्थकांना निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणामध्ये शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव वारंवार भाजपकडून घेण्यात आले आणि शिवसेनेकडून वारंवार त्याला विरोध करण्यात आल्याचे पहायला मिळाले.
मात्र भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे आणि त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी सुशांत सिंह प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा वारंवार आरोप केला आणि शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले.
निलेश राणे यांनी पुन्हा एकदा या संधर्भात ट्विट करत आदित्य ठाकरेंचे समर्थन करणाऱ्यांना टोला लगावला आहे. एव्हडेच नाही तर एका मराठी चॅनेल ने तर विषय वळवण्यासाठी संजय राऊत ची मुलाखत सुद्धा घेतली पण काही साध्य झालं नसल्याचे देखील निलेश राणे यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हंटले आहे.
आदित्यच्या लावारिस लोकांना वाटतंय सोशल मीडियावर बिहार विरुद्ध महाराष्ट्र वाद लावला की आदित्य सुटेल. विषय कुठल्या राज्याचा नाहीये विषय एका क्राईमचा आहे. एका मराठी चॅनेल ने तर विषय वळवण्यासाठी संजय राऊत ची मुलाखत सुद्धा घेतली पण काही साध्य झालं नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 18, 2020