शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची चर्चा आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, महाविकास आघाडी अशा विविध मुद्यांवरील प्रश्नांना उत्तर दिली. आता या मुलाखतीला भाजप नेते निलेश राणे यांनी चंगू-मंगूची मुलाखत म्हटले आहे.
कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली. मुख्यमंत्री होऊन ६ महिने झाले तरी एक मुख्यमंत्री उत्तरं देतोय असं वाटलं नाही. प्रश्न काय आणि उत्तर भलतीच. दूध उत्पादक आंदोलन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, आर्थिक संकटावर उपाय योजना या विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना धड उत्तर देता आले नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 26, 2020
निलेश राणे यांनी ट्विट करत या मुलाखतीवरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विट केले की, कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली. मुख्यमंत्री होऊन ६ महिने झाले तरी एक मुख्यमंत्री उत्तरं देतोय असं वाटलं नाही.
निलेश राणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले की, प्रश्न काय आणि उत्तर भलतीच. दूध उत्पादक आंदोलन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, आर्थिक संकटावर उपाय योजना या विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना धड उत्तर देता आले नाही.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाष्य करताना भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीका केली. या सरकारचे भवितव्य विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नसून, सरकार पाडायचे असेल तर आता पडा, असे खुले आव्हानच विरोधकांना दिले आहे.