मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये 1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार मोठ्या योजनांचं उद्घाटन करण्यात येणार आहेत. यावेळी बोलताना त्यांनी ‘घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ आणि भूमीपुजन आता होतेय. त्याची सुरवात औरंगाबाद म्हणून झाली’, असे म्हणत भाजपला टोला लगावला. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे जे काम हाती घेतात ते पूर्ण कधीच करत नाही, असे म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आश्वसनांची खिल्ली उडवली आहे.
नेहमीप्रमाणे कुठलाही कार्यक्रमाला भाषण करताना त्या जिल्ह्याचे २ प्रश्न 'मी ते सोडवणारच' सांगून मुंबईला निघून जायचं हे उद्धव ठाकरे यांची जुनी पद्धत. आज पण औरंगाबाद मध्ये मी पाणी देतो आणि कचरामुक्त करतो सांगून निघून गेले. उद्धव ठाकरे जे काम हाती घेतात ते पूर्ण कधीच करत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 12, 2020
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, नेहमीप्रमाणे कुठलाही कार्यक्रमाला भाषण करताना त्या जिल्ह्याचे 2 प्रश्न ‘मी ते सोडवणारच’ सांगून मुंबईला निघून जायचं हे उद्धव ठाकरे यांची जुनी पद्धत. आज पण औरंगाबाद मध्ये मी पाणी देतो आणि कचरामुक्त करतो सांगून निघून गेले. उद्धव ठाकरे जे काम हाती घेतात ते पूर्ण कधीच करत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह इतर काही महत्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी ‘ आपण केवळ भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाही. काम पूर्ण करायला आलोय’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचं सांगितलं.