मुंबई : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी प्रमुख संशयित असणारे आमदार नितेश राणे पाच दिवसांपासून फरार आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि सिंधुदुर्ग पोलिसांचं विशेष पथक आमदार राणेंचा शोध घेत आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणेंच्या वतीनं आता मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे.
आमदार नितेश राणे हे गोव्यात लपले असल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाने गोव्यातही अनेक ठिकाणी सापळा रचल्याची माहिती समोर आली आहे. कणकवली पोलिसांनी सलग तिसरी नोटीस देऊनही नितेश राणे हजर झालेले नाहीत. सलग 5 दिवस ते बेपत्ता आहेत.
पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं
अटक टाळण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या वतीनं सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर आता राणेंच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आमदार राणे यांनी त्यांच्या वकिलांमार्फत हा अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळवारी तातडीची सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत आहे, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं राणेंचा जामीन अर्ज फेटाळला होता.
Read also:
- ओमायक्रॉनची धास्ती: मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळा उद्यापासून बंद
- पुणेकरांच टेन्शन वाढवणारी बातमी; दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोकं कोरोनाबाधित
- राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका ओबीसींविना घेऊ नये, बावनकुळेंची सुप्रीम कोर्टात धाव
- आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल
- म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा