पुणे : मागील काही दिवसांपासून खेड-शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध शिवसेनेत संघर्ष पराकोटीला गेला आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी ही सल प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली आहे.लांडेवाडीत शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठी पहिली बैलगाडा शर्यत भरवण्यात येणार होती. शर्यतीच्या आधल्या दिवशी रात्री जिल्हाधिकारी सांगतात की शर्यत होणार नाही. झाली तरी फक्त ५० लोकांमध्येच शर्यत झाली पाहिजे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जातीवाद; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचा उजवा हात असणारा कार्यकर्ता एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करतो. का करतो ? तर फक्त त्याने आढळरावांचं स्टेट्स ठेवलं म्हणून. हा शिवसेनेवर आणि माझ्यावर होत असलेला अन्याय आहे. वेळोवेळी शिवसेनेला कसं संपवता येईल याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.
राज्यपालांवर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोले
सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरते आणि माझ्या गावात भरते म्हणून काही लोकांच्या डोळ्यात खुपलं. हे चांगलं नाही. मागील सहा महिन्यापासून खेड पंचायत समितीचे सभापती यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना जेलमध्ये राहावे लागलं. अजूनही कित्येक कार्यकर्ते जेलमध्येच आहेत. आम्ही विकास करा, निधी द्या या मागण्या सोडून दिल्या आहेत. मात्र या तालुक्यात शिवसैनिकाला शिवसैनिक म्हणून जगून द्या. आमची दुसरी कोणतीही मागणी नाही मात्र आम्हाला फक्त जगू द्या अशी भूमिका शिवाजीराव आढळरावांनी मांडली आहे.
Read also:
- १३ महापालिकांत होणार ओबीसी आरक्षणाविना निवडणुका; निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना मोठा धक्का
- मी अजित पवारांचा मोठा फॅन; भाजप आमदार जयकुमार गोरेंनी उधळली दादांची स्तुतीसुमने
- सांगली जिल्हा बँकेच्या राजकारणात नवा वाद, बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव गायब
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा; यापुढे सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक
- ठाकरे – पाटील विवाहला लागली कोरोनाची नजर, आता अंकिता पाटील देखील कोरोना पॉझिटिव्ह