इंदूर : मुख्यमंत्र्यांना दिलेलं जेवण हे थंड होतं आणि त्याचा दर्जाही योग्य नव्हता त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एका अधिकाऱ्यालाच निलंबित केल्याची घटना घडली आहे. सगळ्याच स्तरातून टीका झाल्याने ते निलंबन मागे घेण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे इंदूर विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांच्या खान पानाची व्यवस्था अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या मनीष स्वामी या अधिकाऱ्यावर देण्यात आली होती. सरकारी प्रोटोकॉलनुसार सर्व काळजी घेण्याचे निर्देश त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
स्वामी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या जेवणाची व्यवस्था होती. नियोजित वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री जेवणार असल्याचं ठरलं होतं. मात्र खराब हवामानामुळे मुख्यमंत्री चौहान हे हेलिकॉप्टरने न येता कारने आले .त्यामुळे त्यांना पोहचण्यास विलंब झाला. त्यामुळे त्यांनी जेवण हे पॅक करून गाडीतच देण्याची सूचना केली. त्याप्रमाणे जेवण पॅक करून देण्यात आलं. नंतर मात्र त्याचा दर्जा योग्य नव्हता आणि जेवण थंड होत असं जिल्हाधिकाऱ्यांना आढळून आलं. त्यामुळे प्रोटोकालचं पालन योग्य पद्धतीने झालं नाही असं सांगत त्यांनी संबंधित अधिकारी स्वामी यांचे निलंबन करण्यात आले मात्र काही वेळाने ते मागेही घेण्यात आले.
Read Also :
भाजपचे आणखी नगरसेवक आमच्या संपर्कात,संग्राम जगताप यांचा गौप्यस्फोटhttps://t.co/n8oXq6aYSe#SangramJagtap #NCP #BJP @sangrambhaiya
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020