नवी दिल्ली : एक देश आणि एक निवडणूक ही भारताची गरज आहे. राष्ट्राच्या हितात राजकारण नको, असेवक्तव्य आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. ते संविधान दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला पाहिजे.
आपण संपुर्ण डिजिटलायझ व्हायला हवे. स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्षाकडे पाहता आपण हे लक्ष्य साधलं पाहिजे, असे आवाहन देखील यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी केले.
याआधी देखील भाजप नेत्यांकडून एक देश एक निवडणुकीबाबत वक्तव्य करण्यात आलेली आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमित शहा यांनी कायदा आयोगाला यासंदर्भात पत्र देखील लिहिले होते. देशात कोठेना कोठे दर महिन्याला निवडणुका होत असतात. यात मोठा खर्च येतो. त्यामुळे एकाच वेळी राज्य व लोकसभेच्या निवडणुका घेण्यात यावे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.