पंढपूर: कोरोनाचा दुसऱ्या लाटेचे सावट थोडे कमी झाले असले तरी, अजून कोराना पूणे संपलेला नाही. यांच पार्वश्वभुमीवर वीस जुलै रोजी होणाऱ्या आषाधी एकादशीसाठी पंढपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.
मात्र तरीही वारकरी पायी वारीचा आग्रह धरत आहेत. परंतू पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश करताना वाखरी येथे सर्व वारकऱ्यांचे दोन डोस झालेले प्रमाणपत्र तपासूनच पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाईल, असं नगराध्यक्षा साधना भोसले यांनी सांगितले.
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्यावर्षी आषाढी वारी रद्द झाली होती. यंदाही या वारीवर कोरोनाचे सावट आहे. पालखी मार्गावर येणाऱ्या अनेक गावांनीदेखील पायी वारीला विरोध केला आहे. सगळ्यात शेवटचं गाव असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क पायीवारी काढल्यास वाखरी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करणार असल्याचा इशारा दिला आहे.
पंढरपुरातील अनेक महत्वाच्या मठात कोव्हिड केअर सेंटर सुरू आहेत. गेल्यावर्षी ३ दिवसात पालख्यांचा मुक्काम पंढरपुरात संपला होता. पण यंदा ३ दिवस पालख्या पंढरपुरात असणार आहेत. त्यामुळे अनेक भाविक दर्शनास येण्याची भीती आहे. पंढरपूरमधील कोरोनाचा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर शासनाने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी नगराध्यक्षांनी केली आहे. आता शासन याबद्दल काय निर्णय घेईल याकडे लक्ष असणार आहे.
दहा पालख्यांना परवानगी
राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना २० बसेस देण्यात येणार आहेत. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार दिवसापूर्वी दिली होती.