सांगली : ओल्या दुष्काळामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागातील मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सर्वच पक्षातील नेते सध्या नुकसान झालेल्या भागांचा दौरा करत, शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील याचीच पाहणी करण्यासाठी सांगलीत पोहचले. यावेळी एका आईचा हंबरडा ऐकून अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
सांगली जिल्ह्यातील तडवळे गावातील तरूण शुभम जाधव अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेला, दौऱ्यात मी कुटूंबियांचे घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी कुटूंबाचे दु:ख ऐकताना मलाही अश्रु अनावर झाले, अतिवृष्टीतील अशा प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. pic.twitter.com/OTuBrTby4T
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) October 21, 2020
गावातील शुभम जाधव हा 22 वर्षांचा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्या माऊलीचा आक्रोश पाहून दरेकर यांनाही अश्रू अनावर झाले. अस्मानी संकटाने जाधव कुटुंबियांचा हाताशी आलेला मुलगा हिरावून घेतला. त्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले, परंतु अद्याप त्यांना शासकीय मदत मिळाली नाही. या माऊलीचे प्रवीण दरेकर यांनी सांत्वन केले.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जाधव कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असं वचन दरेकर यांनी यावेळी दिलं. दरेकरांनी यासंदर्भात तेथे उपस्थित असलेल्या तहसिलदारांशी चर्चा केली.