सोलापूर: सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचन पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पुण्यातून वाहून येणाऱ्या सांडपाण्यापैकी सुमारे ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे इंदापूर तालुक्याला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. या महत्वाकांक्षी योजनेला २ एप्रिल २०२१ रोजी तत्वतः मान्यता देऊन सर्वेक्षणाच्या कामाला सुरु करण्याचे आदेश देखील दिले गेले होते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार Deputy Chief Minister Ajit Dada Pawar आणि राज्यमंत्री दत्तामामा भरणे Minister of State Dattamama Bharane यांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावून इंदापूरला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
इंदापूरच्या दत्ता मामांनी प्रयत्न अगदी योग्यरीत्या केला होता मात्र सोलापूरकरांनी हा प्रयत्न जोरदाररित्या विरोध करत हाणून पाडला. सोलापूर जिल्हातील सर्व पक्षीय आमदारांनी एकत्र येत उजनीच्या पाण्यासाठी संघर्ष केला. भारतीय जनता पक्षातील आमदारांनी उजनीच्या पाण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि महाविकास आघाडी सरकारला निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान अवताडे, आमदार सुभाष बापू देशमुख, उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती यांनी उजनीचे पाणी वाचविण्यासाठी मोठा संघर्ष केला.
उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला वळवण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल घेतला. उजनीतील पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याबाबत बरेच गैरसमज असल्याची कबुली देखील जयंत पाटील यांनी दिली. यात सोलापूरकरांचा विजय झाला आणि इंदापूर तालुका हरला अशी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची भावना आहे. उजनीच्या पाण्याचा संघर्ष आणखी तीव्र होणार यात तिळमात्र शंका नाही. इंदापूर चे लोकप्रतिनिधी आता जयंत पाटलांच्या निर्णयाच्या विरोधात कशी भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
उजनी पाणी वाटपावरून बरेच गैरसमज: जलसंपदा मंत्री Water Resources Minister Jayant Patil
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार व स्थानिक नेत्यांनी उजनीच्या पाण्याबाबत आग्रही भूमिका मांडली आहे. उजनी धरणातून सोलापूरला जे पाणी देण्यात येणार आहे त्या पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागणार नाही असे आश्वासनही देण्यात आले आहे. जलसंधारण विभागाकडे २० एप्रिल रोजी एका आदेश आले होते. २२ एप्रिल रोजी उजनीत येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्यासंदर्भात निर्णय घेतला. त्यासंदर्भात बरेच गैरसमज झाल्याची कबुली जलसंपदा मंत्र्यांनी दिली. तो आदेश रद्द करून सुधारित आदेश काढले जातील, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.