सोलापुर : राज्यात गेल्या अनेक दिवसापासून वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचा वणवा पेटला होता. त्यातच आता राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यावर आता भाजपने राष्ट्रवादीला खोचक सवाल केला आहे.
“आम्हा सर्वांना जेलमध्ये जावे लागले तरी चालेल पण..;”सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा
मोहोळ याठिकाणी राजन पाटील यांची सभा आयोजत करण्यात आली होती. त्या सभेत लोकांना संबोधित करताना आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात. असं वक्तव्य राजन पाटील यांनी केलं आहे. त्यावरून आता भाजपने सुप्रिया सुळे यांना सवाल केला आहे. तुमच्या माजी आमदाराच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देणार आहे? असा सवाल करत हीच संस्कृती आहे का राष्ट्रवादी काॅंग्रेसची ? रूपाली चाकणकर आता राजन पाटील या व्यक्तीला आता नोटीस पाठवणार का ? असाही सवाल केला आहे.
पंजाला मशालीची साथ..! राहुल गांधीच्या यात्रेत आदित्य ठाकरेंची एंन्ट्री
राजन पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटलंय की, हे आमच्या पोरांना बाळं म्हणताहेत. अरे आम्ही पाटील आहोत. आमच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात आणि त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे. तसेच तुम्ही आमच्या पोरांना भिती घालत आहेत. वयाच्या 17 व्या वर्षी 302 कलम भोगणारी आमची पोरं आहेत. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी नेमका गुन्हा केला काय ? जयंत पाटलांचा सवाल
दरम्यान, अलिकडेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केलं होतं. तसेच जिल्हा जिल्ह्यात अब्दुल सत्तार यांचे पुतळे देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांच वक्तव्य “आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात” @supriya_sule जी, तुमच्या माजी आमदाराच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया आहे?
हीच संस्कृती आहे का राष्ट्रवादी काँग्रेसची? @ChakankarSpeaks
जी, या व्यक्तीला नोटीस पाठवणार का? pic.twitter.com/CyBo4zmmbM— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 12, 2022
Read also
- मग आता प्रश्न विचारल्यावर मिरच्या का झोंबतायत ? काॅंग्रेसचा तिखट सवाल
- “राष्ट्रवादीची साथ सोडा सांगून कंटाळलो, अन् निर्णय घेतला”; किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश
- “फडणवीस काल म्हणाले की, द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे, अन् आज आव्हाडांना अटक”
- “आव्हाडांना अटक करून मोगली सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला”
- “आव्हाड साहेबांची कोणतीही चुक नाही, त्यांनीच मला बाहेर काढलं”; मारहाण केलेल्या तरूणाचं स्पष्टीकरण