गेल्या काही दिवसांपासून भाजप हे फेसबुकला हाताशी धरून आपला प्रसार करत असल्याचे मत अनेक भाजप विरोधातील राजकीय नेत्यांनी मांडले त्यानंतर खरंच फेसबुक हे भाजप प्रणित काम करते का याचे उत्तर आता स्वतः फेसबुक इंडियाच्या वतीने देण्यात आले आहे.आमचा मंच हा खुला, पारदर्शक आणि पक्षपात विरहित आहे, असे फेसबूक इंडियाने स्पष्ट केले आहे.
वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रातील लेखामधून फेसबूक भाजपाच्या नेत्यांच्या द्वेषपूर्वक विधानांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी भारतातील फेसबुक व्हॉट्सअॅपवर भाजपाचे नियंत्रण असल्याचा आरोप केला होता.
काय म्हंटलय नेमकं फेसबुकने
फेसबूक इंडियाचे उपाध्यक्ष महासंचालक अजित मोहन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये यााबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
फेसबुक हा एक खुला आणि पारदर्शक मंच आहे.
फेसबुक कुठलाही पक्ष आणि विचारसरणीचे समर्थन करत नाही.
या प्लॅटफॉर्मवर लोक आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतंत्र आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये आमच्यावर आपले धोरण लागू करण्यामध्ये पक्षपात केल्याचा आरोप झाला आहे.
आम्ही या आरोपाकडे गांभीर्याने पाहत आहोत.
आम्ही द्वेष आणि कट्टरता यांचा निषेध करतो.