ऊसतोड मजुरांना सन्मानजनक वाढ द्या अन्यथा कोयता चालणार नाही!!!
करार 3 वर्षाचाच होईल .. covid च्या धरतीवर मजुरांना विमा कवच द्या सरकारने व कारखान्याने ही जवाबदारी घ्यावी..
(१/२)— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 21, 2020
राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज साखर भवनात पार पडली. या बैठकीत राज्यात सुरु असलेल्या ऊसतोड कामगारांच्या संपातील मागण्यांवर चर्चा झाली. याशिवाय ऊसतोड कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी त्या बैठकीला धनंजय मुंडे यांनाही बोलावून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी या बैठकीत केली आहे.
सरकार पातळीवरील विषय चर्चा करण्यासाठी एक आणि भाववाढ व #COVID19 सुरक्षा यावर चर्चा करणारी एक अश्या दोन कमिटी साखर संघाने कराव्या, साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर जी यांनी त्या कॉमिटींचे अध्यक्ष असावे. या दोन्ही या कमिटींनी त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी.
(२/२)— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 21, 2020
तसेच सरकारी पातळीवर असलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एक समिती आणि भाववाढ व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे सुरक्षेचे उपाय यावर चर्चा करणारी दुसरी समिती अशा दोन समित्या साखर संघाने स्थापन कराव्यात व त्या दोन्ही समितीचे अध्यक्ष साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर असावेत. तसेच या दोन्ही समितीने त्यांचे म्हणणे लवादासमोर मांडावे व चर्चा करावी. या विषयाबाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खासदार शरद पवार यांचे मार्गदर्शन घ्यावे असेही त्या म्हणाल्या.
आणि कमिटीच्या सूचना लवादासमोर आणाव्या निर्णय लवादाने घ्यावे अश्या सूचना साखरसंघाच्या बैठकीत मी केल्या.
(२/२)— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 21, 2020
Read Also :
. ‘परंतु घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचे ऑडिट कोण करणार जयंतराव?’