मुंबई : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारने महाविकास आघाडीतील अनेक कामांना स्थगिती दिली. यातच आता सत्ताधारी आमदारांना जर 50 कोटीची कामं दिलीत तर विरोधी पक्षातील आमदाराला निदान 50 कोटी देखील काम दिली पाहिजे. अस मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेला नाही. त्यामुळे जे सत्तेत आले आहेत. ते उद्या घरी बसणारच आहे. असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदें यांना सुनावलं. ते कोल्हापुरात बोलत होते.
“महाराष्ट्र कुठे चाललाय, याचे चिंतन केले पाहिजे”; देवेंद्र फडणवीस
शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत असताना नुसतं सर्वसामान्यांचं सरकार सांगून चालत नाही, तर या सर्व लोकांना आपलं सरकार वाटायलं हव. बेरोजगारी वाढवणारं सरकार आहे. मोठे मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्याला पाठवणारं सरकार आहे. शेतकऱ्यांना वेळेवर मदत झाली नाही. पाऊस अजूनही सुरू असल्याकारणाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालं. परंतु या संदर्भात ते बोलायला तयार नाहीत. असं देखील अजित पवारांनी म्हटलं.
“मालकासाठी स्वतःच्या आई बापाची अब्रू चव्हाट्यावर आणली”; राष्ट्रवादीचा टोला
महाविकास आघाडीचं सरकार असताना कोरोना काळात देखील आम्ही कामं थांबवली नाहीत. त्यावेळी लोकांना आम्ही कामं थांबली म्हणून काही समजून दिलं नाही. तरी काय एकनाथरावांच्या मनात आलं. अन् 40 लोकं घेऊन निघून गेले. अशी मिश्किल टिप्पणी देखील अजित पवारांनी शिंदेंवर केली. लोक निवडून आलीत धनुष्यबाणावर अन् 50 खोके एकदम ओक्के असं म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना डिवचण्याचा देखील प्रयत्न केला. अगदी शेवटच्या व्यक्तीदेखील कळायला लागले की पन्नास खोक्के एकदम ओक्के. हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. असं म्हणत त्यांनी शिंदेंचा चिमटा काढला. सत्ता सत्ता झाली परंतु असे आरोप महाराष्ट्रात कधी झाले नाहीत. असंही ते म्हणाले.
“राज्यात जनता नाराज.! त्यामुळे सरकार दिर्घकाळ टिकणार नाही”; अमोल मिटकरी
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर त्यांच्यावर 50 कोटी रूपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख नेहमी 50 खोके, गद्दार म्हणून केला. त्याचबरोबर विरोधी पक्षांनी देखील पन्नास खोक्के म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात बंडखोर आमदारांवर पन्नास खोक्के एकदम ओक्के म्हणून म्हण प्रचलित झाली.
Read also
- “..म्हणून मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्व, गदर, उठाव अशा थापा मारणं बंद कराव”
- “चंद्रकांतदादा, तुमच्या नेत्यांचा आदर सर्वांनाच आहे, पण..”; रोहित पवार
- “एवढं केल्याने राणेंचा महिन्याचा पगार होत असेल”; मनिषा कायंदे घेतला राणेंचा समाचार
- “40 डोके अन् 50 खोके असलेल्याचं दहन होऊन रामराज्य लवकरच येईल”; रूपाली पाटील
- “शिवसेना-काॅंग्रेस सोबत युती करायला आम्ही तयार”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य