मुंबई : सुशांत सिंह प्रकरणामध्ये माध्यमांनी कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता वाटेल त्या प्रकारे रिपोर्टींग केल्याचे दिसून आले. त्यामुळे सुशांत सिंह प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांची प्रतिमा काही माध्यम मलीन करत असल्याचा आरोप करत निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.याबाबत निवृत्त अधिकाऱ्यांनी न्यायपालिकेकडे एक याचिका दाखल केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या याचिकेची स्वागत केले आहे.
मुंबई पोलिसांचं देशामध्ये एक नाव आहे. मात्र सुशांतसिंह प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना ज्या प्रकारे बदनाम करण्यात आले त्याबाबत पोलीस दलातील काही निवृत्त अधिकाऱ्यांनी न्यायालयाचे दार ठोठवात एक याचिका दाखल केली असल्याची माहिती यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अतिशय चांगले काम आमची पोलीस यंत्रणा करत होती मात्र मुंबई पोलिसांना या प्रकरणामध्ये केवळ टार्गेट करण्यात आले त्यामुळे निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी जी याचिका दाखल केली आहे त्याचे मी स्वागत करतो असे अनिल देशमुख यांनी यावेळी म्हंटले आहे.
Read Also
मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटतीय ? कंगनाचा खळबळजनक आरोपhttps://t.co/JS8rxqhdGv@KanganaTeam @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 3, 2020