मुंबई – शरद पवारांनी काँग्रेसला ताकत दिलेली ताकत पाहता तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होते पण त्यांची संधी हुकली. ज्यामुळं त्यांच्यासह काँग्रेस आणि देशाचे मोठे नुकसान झालं, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी इंग्रजी दैनिक हितवादसह अनेक वर्तमानपत्रात पवारांवर लिहिलेल्या लेखात शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाविषयी महत्वाचे भाष्य केलं आहे. 1996 साली शरद पवार पंतप्रधान असणारं काँग्रेस सरकार बनलं असतं पण नरसिंह रावांमुळं देवेगौडा सरकार आलं, असंही प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे
प्रफुल्ल पटेल यांनी लेखात म्हटलं आहे की, काँग्रेसची काम करण्याची पद्धत ‘सुनियोजित बंड’ घडवून आणणे, आपल्या पक्षात स्वतःच क्षेत्रीय नेतृत्वाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणे अशी आहे. जे पवारांसोबतही केले गेले. पहिला फटका पवारांना 1989 ला आर के धवन, माखनलाल फोतेदार यांनी मोठे षडयंत्र करून देण्याचा प्रयत्न केला जो पवारांनी फोल पाडला, असंही पटेलांनी म्हटलं आहे.
ते लेखात म्हणतात, राजीव गांधींच्या हत्येनंतर फक्त पवारांना दूर ठेवणे या एका अजेंड्यासाठीच नरसिंह राव यांना आणले. देशभर काँग्रेसला पवार हवे होते. 1996 मध्ये पवार पंतप्रधान असणारी काँग्रेस सरकार बनू शकत असतानाही फक्त नरसिंह रावांमुळे देवेगौडा सरकार बनली. माझ्या घरातून ह्या घडामोडी होत होत्या, मी अधिकाराने हे सांगू शकतो, असा दावा देखील प्रफुल पटेलांनी केला आहे.
केसरीच्या वेळी जेव्हा गुजराल पंतप्रधान झाले. तेव्हा आम्ही आमच्या नजरेसमोर पवारांनी आपल्या स्वताच्या महत्वाकांक्षांचा गळा पक्षासाठी दाबला. सॉफ्ट स्टँड घेतला आणि अगदी सोपे असलेले पंतप्रधान पद सोडले हे आम्ही बघितले आहे. 13 दिवसात पडलेले वाजपेयी सरकार फक्त पवारांमुळे पडले. पण तरीही त्यांना मिळायला हवे होते ते स्वातंत्र्य काँग्रेसने त्यांना दिले नाही, असं पटेल यांनी म्हटलं आहे. त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेस ने अपमान केला. पार्लियामेंटरी पार्टीचे मुख्य बनवून त्यांनाच अंधारात ठेवले जायचे. महाराष्ट्रात आणि केंद्र स्तरावर त्यांच्या नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या सतत गोष्टी घडवल्या जायच्या, असे आरोप देखील प्रफुल पटेल यांनी केले आहेत.
प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे की, आज 80व्या वर्षात पवार साहेबांना ज्या पदावर पाहायचं आहे ते अजून पाहिलेलं नाही. जर महाराष्ट्रानं ठरवलं साथ दिली तर हे शक्य होऊ शकतं जर ममतांचे 36 खासदार निवडून येऊ शकतात जगनमोहन यांचे 28 खासदार निवडून येऊ शकतात तर महाराष्ट्रांचे 48 खासदार पवारांच्या मागे का उभे राहू शकत नाही? जेव्हा आपण पवार साहेबांचा 85 वा वाढदिवस साजरा करू त्यावेळी आपलं स्वप्न साकार झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही आणि या सबंध महाराष्ट्रात पवार साहेबांवर प्रेम केलं आहे पण पवार साहेबांच्या मागे राहिलेलं नेतृत्व करू शकतात ती मला खात्री आहे, असं त्यांनी म्हटलंय.