मुंबई: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय.
साहेब आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. कोरोना काळात आपण प्रचंड मेहनत घेत कुटुंबप्रमुखा प्रमाणे महाराष्ट्र राज्याचा साभांळ केला आहे. त्याबद्दल आपले कौतुक करावे, तितके कमी आहे. आपण बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, दिलेले वचन पूर्ण केले आहे. पण या परिस्थीत जे काही राजकारण सुरु आहे, त्या सत्तेत एकत्र राहुन काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, तसेच आपला पक्ष कमकुवत करत आहे. जर अशी परिस्थी असेल तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळून घेतले बरे आहे. हा माझा वैक्तीत सल्ला आहे. अशा आशेयाचे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
सरनाईक म्हणाले की, कोणतीही चुक नसताना आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणाकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून ही बदनानमी चालू आहे, त्याला कुठे तरी आळा घालणे गरजेचे आहे. तसेच याप्रकरणामध्ये आम्हाला टार्गेट करत असताना आमच्या कुंटुबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोट आरोप होत आहेत. सुडबुद्धीचे राजकारण चालू आहे. एका आरोपातून जामिन मिळा की दुसऱ्या आरोपात गुंतवण्याच येत आहे. ही यंत्रणा जाणिवपूर्वक आमच्या मागे लागली आहे. हे कोठे तरी थांबायला हवे असे म्हणले आहे.
तसेच पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध आज ही जिव्हाळ्याचे आहेत. ते अजूनही तुटण्याआधी आपण जुळून घेतलेले आपल्या फायद्याचे आहेत. तसेच त्यांचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना होईल. गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेंक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदाराची कामे झटपट होतात, मात्र आपला मुख्यमंत्री असून ही शिवसेनेच्या आमदाराचे कामे होत नाही. भाजपाची युती तोडून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. तसेच राज्यात काँग्रेस राष्ट्रावादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले अशा चर्चाना उधान आले आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
प्रताप सरनाईक त्यांचे आमदार आहेत, नेते आहेत. त्यांचे नेते उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी विचार करावा. आमचे नेते केंद्रात आहेत. आम्ही त्यांना सांगू. बाकी आम्ही सुरुवातीलाच सांगत होतो की, बाळासाहेब ठाकरे यांची हयात ज्यांच्याविरोधात लढण्यात गेली, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी सरनाईक यांच्या पत्रावर दिली आहे.