राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करत आहेत. याआधी त्यांनी सोलापूर जिल्ह्याचाही दौरा केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यांवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली
प्रवीण दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. “मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल, तर त्यांनी घरातच बसावं. मात्र शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी” अशी मागणी यावेळी प्रवीण दरेकरांनी केली.
“केवळ केंद्र सरकारवर बाजू ढकलून राज्य सरकारमधील नेते राजकारण करत आहेत. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा” अशी अपेक्षा प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली.
“एकीकडे शरद पवार म्हणतात पंचनामे आणि प्रक्रिया करायला वेळ लागेल आणि दुसरीकडे म्हणतात केंद्र सरकारने तातडीची मदत घ्यावी, म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले जात आहे, राजकीय दृष्टीकोन बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीचे निर्णय घेणे गरजेचे आहे” असेही दरेकर म्हणाले.
Read also:
लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे बोलतो ते मी करतो…https://t.co/4rNcn0TBUA#CMThackarey #Shivsena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 21, 2020