पुणे : काल भाजपवाले जे फटाके वाजवीत होते, पेढे भरवून फुगड्या घालत होते. त्यातले ९९ टक्के या लढाईत कुठेच नव्हते. पण श्रेय घ्यायला सगळ्यात महाराष्ट्रात हे आरक्षण लागू झालं. १९९४ ला CM शरद पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे लागू झालं आहे. त्यांनी मंडल आयोग लागू केला. व्ही.पी.सिंग यांनी ७३/७४वी घटना दुरुस्ती करून पंचायत राज्यातले ओबीसी आरक्षण आणले. राजीव गांधी, नरसिंह राव यांनी संघ परिवार आरक्षण मुक्त भारताची पताका घेऊन काम करीत होता आहे. असं प्राध्यापक आणि व्याख्याते हरी नरके यांनी म्हटले आहे.
द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? आज ठरणार देशाचा 15 वा राष्ट्रपती कोण? वाचा सविस्तर
ओबीसी व्होटबँक आकाराला आली. सत्ता हवी तर संख्येने ५२% असलेला, बारा बलुतेदार, अलुतेदार ओबीसी सोबत हवा. हिंदू हिताचे ढोल पिटता यावेत यासाठी दुटप्पी भूमिका डावपेच म्हणून संघ भाजपने घेतली. तोंडाने आरक्षणाला पाठिंबा द्यायचा, पण कुजबुज, अफवा, प्रचार कायम आरक्षण द्वेषाचा आरक्षण परत मिळाले. सर्वात मोठे योगदान महेश झगडे यांचे होते. बांठीयांचा सामाजिक न्यायविरोध व ओबीसी द्वेष यामुळे ओबीसींची लोकसंख्या कमी दाखवली गेली. जर झगडे या आयोगात नसते तर कातडीबचावू सदस्य व ओबीसीद्वेष्टे बांठीया यांनी ओबीसींची कत्तल केली असती. धन्यवाद झगडे, ओबीसी आपले कृतज्ञ आहेत. असंदेखील त्यांनी म्हटले आहे.
“ओबीसी समाजाच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई महाराष्ट्राने जिंकल्याचं समाधान”
जनगणनेला फडणवीस विरोध का करताहेत? कारण आम्ही आरक्षण देऊ, श्रेय घेत आमची सामाजिक न्यायविरोधी प्रतिमा पुसून काढू, पण शिक्षण, आरोग्य, निवारा, रोजगार मात्र हिरावून घेऊ. बजेट देणार नाही. भावनिक हिप्नोटिझममध्ये ओबीसी राहील याची पुरेपूर काळजी घेऊ. फडणीसांचा मतदार संघ आणि पूर्ण विदर्भ ओबीसी बहुल म्हणून फडणीस पाठींबा देताहेत. आरक्षण काढून घेणारे हेच. दिल्याचे श्रेय घेणारेही हेच. कमालीचे संघटित. परफेक्ट नियोजन आणि मीडियावर हुकूमत कत्तल करणारा मारेकरीच वाचवल्याचे श्रेय घ्यायला पुढे. दुसरीकडे आयोगातले सगळे निवृत्त ओबीसी अधिकारी एक महेश झगडे सोडले तर कातडी बचावू असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“चित्रा ताई, डोके ठिकाणावर आहे का”? रूपाली पाटील चित्रा वाघ यांच्यावर कडाडल्या
चंद्रशेखर बावनकुळे यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, बावनकुळे साहेब आपण स्वप्नात राहू नका. आपल्या केंद्र सरकारने इम्पेरीकल डेटा मागच्या काळात राज्य सरकारला न दिल्यामुळे ओबीसीचे आरक्षण गेले. मविआ सरकारने बांठीया आयोग स्थापन करून 27 टक्के आरक्षण देऊन ओबीसी बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय दिला असंही ते म्हणाले.
Read also
- “बावनकुळे साहेब…आपण स्वप्नात राहू नका”; अमोल मिटकरींचा बावनकुळेंना टोला
- “फडणवीस हे बालिशच आहेत, सत्तेसाठी आसुरलेले नेते”; राष्ट्रवादीचा फडणवीसांवर हल्लाबोल
- भाजपच्या 4 आमदारांची आर्थिक फसवणुक करणारा पोलिसांच्या ताब्यात
- “राऊतांना राष्ट्रवादीत जायचं आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेना फोडली”; रामदास आठवलेंचं वक्तव्य
- मी आज मुख्यमंत्री नसलो तरी…; OBC आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया