दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी कृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एक ट्विटर पोल सुरु केला आहे. नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भातली चर्चा ३५ दिवसांपासून सुरु असल्याने त्यांनी हा पोल सुरु केला आहे.
मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत ही शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र मोदी सरकारने यावर अद्याप चर्चांच्या फेऱ्या वगळता काहीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता ट्विटर पोल करुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी जो ट्विटर पोल केला आहे तो काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचं हित न पाहणारे काळे कायदे रद्द करत नाहीत कारण…. असा प्रश्न विचारत त्यांनी चार पर्याय दिले आहेत.
काय आहेत हे चार पर्याय?
पर्याय पहिला – मोदी शेतकरी विरोधी आहेत
पर्याय दुसरा – मोदींना क्रोनी कॅपिटालिस्ट चालवत आहेत
पर्याय तिसरा – पंतप्रधान नरेंद्र मोदी हट्ट सोडू शकत नाहीत
पर्याय चौथा – उपरोक्त सर्व पर्याय
Mr Modi is refusing to repeal the anti-farmer laws because he is:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 30, 2020
असं म्हणत राहुल गांधी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. मागील चार तासांपासून हा पोल ट्विटरवर आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी आपलं मत नोंदवलं आहे. ट्विटरवर या पोलची चांगलीच चर्चा रंगली आहे. २४ तासांसाठी त्यांनी हा पोल त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सुरु केला आहे.
Read Also :
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला…
“छगन भुजबळ आणि वडेट्टीवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”
“संजय राऊत यांच्या कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा”; किरीट सोमय्या यांची मागणी
खासदाराच्या उपस्थितीच शिवसैनिकाची पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण