राज ठाकरे यांनी आज जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज ठाकरे पहिल्यांदाच राज्यपालांना भेटणार असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. रा ज्यपालांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून भेटीचं कारण उघड केलं.
यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. “राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णया घेण्याची असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही”, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली.
तसेच भेटीमध्ये झालेल्या चर्चेत राज्यपाल यांनी राज ठाकरे यांना शरद पवार यांच्याशी बोलून चर्चा करावी असा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही पवारांशी बोलून चर्चा करू, असं राज म्हणाले. दरम्यान, लॉकडाऊननंतर राज्यातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत आहे. ही बिले कमी व्हावीत आणि नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी मनसेने आंदोलने केली