ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा पार पडणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत राज्यात प्रचंड गदारोळ माजला होता. त्यामुळे या सभेत विरोधकांनासह सत्ताधारी तसेच संपुर्ण राजकीय नेत्यांना या सभेतुन उत्तर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता ठाण्यातील सभेतील थेट प्रेक्षपण जम्मू काश्मीरमध्ये देखील करण्यात येणार आहे. यासंबंधी काश्मीर पंडितांनी पोस्टर लावले आहेत. तर ठाण्यातील या सभेत राज ठाकरे यांनी विरोधकांवर तोप डागली.
राज ठाकरे म्हणाले की, माझ्या ताप्याला कोणीतरी अडवणार आहे. हे यंत्रणांना कळलं परंतु पवार साहेबांच्या घरी कोण जाणार हे कुणाला समजलं नाही. गुडीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी अकलेचे तारे तोडले. परंतु याला उत्तर दिलं पाहिजे. पत्रकार परिषदमधून यांचं उत्तर देता आलं असतं. परंतु काही पत्रकारांनी विषय भरकटवलं असतं. त्यामुळे ही जाहीर सभा घेत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने मतदारांशी प्रतारणा केली. मला इडीची नोटीस आली म्हणून मी ट्रक बददला. मी नाही ट्रक बदलला. त्या कंपनीची मला इडीची नोटीस आली होती, म्हणून मी इडीच्या कार्यालयात गेलो होतो. महाविकास आघाडीच्या प्रयोगावर टिका करणं ही यांची संस्कृती होती.
जम्मू काश्मीर मधील जे 370 कलम रद्द केलं होतं. तेव्हा त्यांचं अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं. माझ्या भाषणानंतर काही प्रतिक्रिया आल्या, सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. लाव रे तो व्हिडीओ म्हणणाऱ्याला एका इडीची नोटीस आली म्हणून एवढं बदलतील हे मला आश्चर्य वाटतं. एकाच घरात राहुन अजित पवारांवर इडीची रेड पडतेय. ते मला कळलं का ? असंही ते म्हणालेत.