मुंबई :- देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा कल हाती लागत आहे. तेलंगणा मुख्यमंत्री केसरी राव, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत छत्तीसगड चे मुख्यमंत्री भुपेश बघेन या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्याचे भवितव्य पणाला लागले आहे. कुणाची खुर्ची वाचणार? कुणाची जाणार? याचा फैसला आज होणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतमोजणी सुरू झाली आहे.
राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या १९९ जागापैंकी १६३ जागांमधून भाजप ८८ तर काँग्रेस ६९ जागांवर आघाडी घेतली आहे. छत्तीसगड मध्ये ९० जागांपैकी ५५ जागांमधून भाजप ३२ तर काँग्रेस ४१ जागांवर आघाडी घेतली आहे.
तेलंगणा राज्यात ११९ जागांपैकी ५४ जागांमधून बीआर एस ला २८ तर तर काँग्रेसला ५२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपच्या वाट्याला 03 जागावर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे मध्यप्रदेशात २३० जागांपैकी १७३ जागांमधून काँग्रेस ७४ तर भाजप ९६ जागांवर आघाडी घेतली आहे.