राजस्थानमध्ये मागील काही दिवसांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्येच दोन गट पडले असून, सत्तासंघर्ष सुरू आहे. यात रोज नवनवीन घटना घडत आहेत. राजभवन, उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयातही हा संघर्ष पोहचला. भाजपने मात्र या प्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत निवडून आलेल्या आमदारांना शेळ्या, मेंढ्यासारखं हाकलत आहे. त्यांना धमकावून फोन टॅप करत आहेत, अशी खरमरीत टीका केली आहे.
चुने हुए विधायकों को भेड़ बकरियों की तरह हांक कर, डरा – धमका कर, निगरानी में रख कर, उनकी जासूसी कर कौन से लोकतंत्र को बचाने की नौटंकी कर रहें हैं गहलोत जी ?!!#RajasthanPoliticalCrisis
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) August 7, 2020
शेखावत यांनी ट्विट केले की, निवडून आलेल्या आमदारांना शेळ्या, मेंढ्यासारखं हाकलं जात आहे. त्यांना आमदारांना धमकावलं जातंय, त्यांच्यावर देखरेख ठेवून त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. आमदारांवर पाळत ठेवून लोकशाही वाचवण्याच्यासाठी गेहलोतजी कुठली नौटंकी करत आहेत?
जैसलमेर के होटल में बंद विधायकों के फ़ोन टैपिंग, इंटरकॉम टैपिंग, होटल में मोबाईल जैमर लगाना…
गहलोत जी, इतना भय?!! इतना अविश्वास?!!#RajasthanPoliticalCrisis
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) August 7, 2020
शेखावत यांनी आणखी एक ट्विट करत गेहलोत यांच्यावर टीका केली. त्यांनी लिहिले की, जैसलमेरच्या हॉटेलमध्ये बंद असलेल्या आमदारांचे फोन टॅपिंग, इंटरकॉम टॅपिंग करण्यात येत आहे. याशिवाय हॉटेलमध्ये मोबाईल जॅमर देखील लावण्यात आला. किती भय ? किती अविश्वास ?