कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल. पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही. आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा आहेत असा इशाराच राजू शेट्टी यांनी सरकारला शेतकरी विधेयकारून दिला आहे. शेट्टी यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. शेतकऱ्यांचा हक्क काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांची मुलं हातात दगड घेतील असंही ते म्हणाले आहेत.
काल केंद्र सरकारने किसान विधेयकाला अनेक पक्षांचा विरोध असताना देखील मंजूर करून घेतले त्यानंतर अनेक विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. राजू शेट्टी यांनी देखील आता याबाबत भाष्य केले आहे.
पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल ! पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा आहेत.
राजू शेटटी.@ANI pic.twitter.com/M1nv3rUAwJ— Raju Shetti (@rajushetti) September 21, 2020
पुढे ते म्हणाले आहेत की, “भलेही तुम्ही कटकारस्थान करुन आणि इतर राजकीय पक्षांच्या सहकाऱ्याने शेतकऱ्याला कॉर्पोरेट सेक्टरच्या घशात घातलं. त्याला शहरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हमीभाव हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो जर काढून घेण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस या देशातील करोडो शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील. या दगडांमध्ये तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत हे लक्षात ठेवा”.
Read Also
कोणत्या मराठा नेत्यांना आरक्षण नको ते स्पष्ट सांगा ?https://t.co/or39bSroZe#Ashokchavhan #ChandrkantPatil #BJP #Congress@AshokChavanINC
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 21, 2020