यापूर्वी आठवले यांनी कंगनाचे मुंबईबाबतचे वक्तव्य चुकिचे असले तरी तिला मुंबईमध्ये येऊ देणार नाही ही भूमिका अयोग्य असल्याचे म्हंटले होते. तसेच कंगनाच्या सुरक्षेसाठी रिपाईचे कार्यकर्ते सज्ज असल्याचं सांगत तिला आपला पाठिंबा असल्याचंही दर्शवला होता. दरम्यान, मुंबई महापालिकेने काल कंगनाच्या कार्यालयाचा काही भाग अनाधिकृत असल्याचं सांगत कारवाईचा बडगा उगारला होता. यानंतर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याची टीका, विरोधकांना कडून करण्यात आली आहे.
“कंगनाविरोधात सरकार सूडबुद्धीने केली आहे , जाणूनबूजुन कंगनाला त्रास देत आहे, मुंबई सर्वांची आहे मुंबईत राहण्याचा अधिकार सगळ्यांचा असल्याचे ते म्हणाले. कांगनावर ड्रग्ज घेतल्याचे आरोप बिनबुडाचे आहे . सामानाविरोधात गुन्हा दाखल करा , अशी मागणीही त्यांनी केली आहे.