नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि त्याच्या मालकीचे व्हॉट्सअॅप अनेकदा राजकीय वादात अडकले आहे. आता फेसबुकने माजी माजी लोकसभा अध्यक्षा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मीरा कुमार यांचं फेसबुक अकाउंट ब्लॉक केल्याने पुन्हा एकदा कंपनी वादात अडकली आहे.
We witnessed as to how #Facebook India leadership was compromised by Modi Govt as subservient to its agenda.
Now blocking the account of Former Speaker & a leading light of @INCIndia proves that petty tactics are being used to stifle the voice of Opposition leaders. https://t.co/JAK1dsz8qU
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) October 15, 2020
मीरा कुमार यांनी ट्विट केले की, फेसबुक पेज ब्लॉक केले गेले! असे का? लोकशाहीवर आघात! हा केवळ योगायोग असू शकत नाही की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या अगोदर फेसबुकडून माझे पेज ब्लॉक केले जाते.
काँग्रेसने देखील फेसबुकने मोदी सरकारसोबत तडजोड केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, फेसबुक इंडियाच्या प्रमुखांनी मोदी सरकारच्या अजेंड्यासाठी कशी तडजोड केली हे आम्ही पाहिलं आहे. आता माजी लोकसभा अध्यक्ष आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या मीरा कुमार यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं. यातून विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी खालच्या स्तरातील रणनीतीचा उपयोग केला जात असल्याचं सिद्ध होत आहे.