भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असा टोमणा दानवे यांनी लगावला.
महाविकास आघाडीबाबत रावसाहेब दानवे म्हणाले, “महाराष्ट्रात अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते एकमेकांच्या पायात पाय घालून आपोआपच पडेल”. तसेच राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, केंद्र सरकार तर मदत करतच आहे, असंही दानवे म्हणाले.
राममंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. शिवसेनेचा नारा होता की ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असे झाले आहे. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राममंदिरच्या पायाभरणीसाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.