अभिनेत्री कंगना रानौतवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आज मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली होती असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच कंगनाला पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे.
आता यावरुन भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुंबई पालिका आणि संजय राऊतांवर टीका केली आहे. उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये सोमय्या यांनी, ‘कंगना रनौत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुंबईच्या महापौरांनी आणि पालिका आयुक्तांनी आता राजीनामा द्यायला पाहिजे. संजय राऊतांची तर बोलतीच बंद झाली आहे’ असे म्हणत टोला लगावला आहे.
V welcome Highcourt Order on #KanganaRanaut demolition case. Mumbai Mayor & BMC Commissioner should Resign. #SanjayRaut ki Bolti Bandh Ho Gayi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/DhWqQsZ6QI
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 27, 2020
दरम्यान, मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना रनोटच्या बंगल्यावर झालेली कारवाई बेकायदा होती असे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, कंगनाला ही कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मदत सुद्धा मिळू नये असे प्रयत्न झाले. मुळात बीएमसीने (बृहन्मुंबई महापालिका) कंगनाच्या बंगल्यावर कारवाईसाठी जी नोटिस बजावली होती तीच हायकोर्टाने रद्द केली
Read Also :
“सर्वोच्च आणि उच्च न्यायालयालासुद्धा ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?,” फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल
‘आज सरकार पाडू, उद्या पाडू म्हणणार्यांचेच दात पडलेत’ मुख्यमंत्र्यांची भाजपवर खोचक टीका
शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली’ मार्चनं दिल्लीच्या सीमांना छावणीचं स्वरुप