मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेलापुरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस ‘मला आजही मुख्यमंत्री असल्याचे वाटते.’ असे म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. फडणवीस यांच्या या विधानाची राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खिल्ली उडवली आहे.
शेतकऱ्यांना चिरडणं म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही; सुप्रिया सुळेंनी भाजपला फटकारले
नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना फडणवीसांना टोला लगावला. “मी मुख्यमंत्री नाही असे मला वाटतच नाही, असे विधान फडणवीसांनी केले. तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका. विरोधी पक्षनेतेपदही तेवढेच मोठे आहे. दोन वर्षांपासून फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाही. ते आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेतच काम केले पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढले पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद मुख्यमंत्रीपदापेक्षा कमी नाही, हे त्यांना कळले पाहिजे, असा चिमटा मलिकांनी फडणवीसांना काढला आहे.
विमानतळाच्या उद्धाटनला शेजारी-शेजारी बसले; तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही
यावेळी नवाब मलिक यांनी कोळसा टंचाईवरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. देशात कोळसा तुटवडा निर्माण झाला आहे. याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे देशातील व राज्यातील बरेच वीजनिर्मितीचे संच बंद पडले आहेत. कोळसा आयात करूनही तो उपलब्ध होत नाही. आयातीमुळे देशाला जास्त परकीय चलन लागते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भविष्यात जास्त वीज लागणार आहे, त्यामुळे विजेची निर्मिती झाली पाहिजे म्हणून पॉलिसी निर्माण केली. परंतु, भाजपाने कोळसा घोटाळा झाला म्हणून रान उठवले होते. कालांतराने त्या खाणी काही लोकांना देण्यात आल्या. त्या आजपर्यंत सुरू झाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. या सगळ्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.
Read Also :
- महापालिकेत भाजपा-मनसेची युती पक्की? कोअर कमिटीच्या बैठकीआधीचं मनसेनेते फडणवीसांच्या भेटीला
- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना नो एन्ट्री; व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण भोवल?
- मोठी बातमी: २ ते १८ वर्षांच्या मुलांना लसीकरणासाठी केंद्र सरकारची मंजूरी; कोणती लस मिळणार?
- ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं – पंकजा मुंडे
- शिवसेना खासदार भावना गवळींवर अटकेची टांगती तलवार; ईडीची ३ पथकं वाशिममध्ये दाखल