मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातींसाठी लोकसंख्येवर आधारित आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र लोकसंख्येची योग्य माहिती उपलब्ध असेल तरच त्याची अमलबजावणी केली जाऊ शकते असंही ते म्हणाले आहे.
जदयूचे वाल्मिकीनगरमधील खासदार वैद्यनात महतो यांचं निधन झालं आहे. यामुळे मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून यानिमित्ताने आयोजित प्रचारसभेत नितीश कुमार बोलत होते. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून सध्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरु आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री नितीश कुमार
जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तर थेट लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची मागणी केली आहे. प्रत्येक जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं, अशी आपली पहिल्यापासूनची मागणी असल्याचं नितीशकुमार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या या मागणीला मतदार किती प्रतिसाद देतात हे आगामी काळातच स्पष्ट होईल. जातीनिहाय जनगणना करणं हे आपल्या हातात नाही. मात्र, जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावं ही आपली मागणी असून त्यात कोणतंही दुमत नाही, असं नितीशकुमार म्हणाले.
Read Also :
टाळेबंदीत एसटीचं मोठं नुकसान, तोटा भरुन काढण्यासाठी 3600 कोटींची गरज: मंत्री अनिल परब https://t.co/Zad8gO987d @advanilparab @ShivSena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020