मुंबई : संभाजी ब्रिगेडने मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य घटनेच्या 340 कलमानुसार ओबीसीसाठी पात्र ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली.
संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणावर आपली भूमिका आणि मागणी असल्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवले आहे. हे निवेदन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांनाही देणार असल्याची माहिती शिवानंद भानुसे यांनी दिली.
“मराठा समाजाच्या अनेक न्यायिक मागण्या या आंदोलनातून पुढे आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाच्या दीर्घकालीन सुरु असलेली आरक्षणाची मागणी जोर धरु लागली. याचा विचार करत महाराष्ट्र सरकारने आरक्षणासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. पहिला टप्पा म्हणून काही सवलती मराठा समाजाला देण्यात आल्या. न्यायमूर्ती गायकवाड आयोग यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्याच आधारे घटनेच्या 15(4) आणि 16(4) या कलमांतर्गत महाराष्ट्रापुरता एसईबीसी हा वर्ग तयार करण्यात आला आणि मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आणि शिक्षणामध्ये 12 टक्के आरक्षण दिले. काही दिवस या सवलती सुरु राहिल्या आणि आता सर्वोच्च न्यायालयात त्यास अंतरिम स्थगिती देण्यात आली,” अशी माहिती शिवानंद भानुसे यांनी दिली.
Read Also
मोदींच्या काळातील वाताहतीचे ‘आत्मचिंतन करा’,अशोक चव्हाण यांचा फडणवीसांना टोलाhttps://t.co/dBQjQrbeZl#AshokChavhan #Devendrafadnavis #congress #Bjp @AshokChavanINC @INCMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 19, 2020