अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाने सीबीआयला सोपवल्यानंतर अनेक नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आमदारांनी तर थेट गृहमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली.
मुंबई पोलिसांची कार्यकक्षा मर्यादित असून या प्रकरणात सखोल तपास होणं गरजेचं आहे असं न्यायालयाने सांगितलं. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर विरोधक आणि महाराष्ट्र सरकारच्या बाजूने बोलणारे असे दोन गट सोशल नेटवर्किंगवर पडल्याचे चित्र दिसून आलं. ट्विटवर तर या प्रकरणासंदर्भातील अनेक हॅशटॅग ट्रेण्ड होत होते.
आज संजय राऊत यांनी आपल्या शायराना अंदाजामध्ये एक ट्विट केले आहे. ‘संजय ऊवाच’ या टॅगने राऊत यांनी आपली शायरी ट्विटरवर शेअर केली आहे. उनसे कहना की.. किस्मत पे इतना नाज ना करे.. हमने बारिशों मे भी जलते हुए मकान देखे है…”, असं ट्विट राऊत यांनी केलं आहे. तसेच या ट्विटखाली त्यांनी जय महाराष्ट्र असंही लिहिलं आहे. हे ट्विट नक्की कशासंदर्भात आहे याबद्दल राऊत यांनी थेट उल्लेख केलेला नसला तरी जय महाराष्ट्र या शब्दांवरुन हे ट्विट हे सुशांत प्रकरणावरुन असल्याचे स्पष्ट होतं आहे.
::संजय ऊवाच::
"उनसे कहना की..
किस्मत पे इतना नाज ना करे..
हमने बारिशों मे भी
जलते हुए मकान देखे है…"जय महाराष्ट्र!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 20, 2020