मुंबई : महिलांच्या संरक्षणासाठी नव्याने अंमलात येणारा दिशा कायदा आणि सध्या अस्तित्वात असलेले कायदे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. गरज पडल्यास महिलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देता येतील का याचाही विचार व्हावा अशी सूचना नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी संबंधित सर्व विभागांची बैठक घेतली.
या बैठकीत प्रामुख्याने दिशा कायदा अस्तित्वात येण्यासाठी चर्चा झाली. अशा प्रकारच्या कायद्यामुळे इतर राज्यामध्ये झालेला परिणाम, स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन, महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणे, त्यावरची कारवाई, न्यायालयातले खटले अशा अनेक पैलुंवर या बैठकीत चर्चा केली. दिशा कायद्याचा मसुदा सामाजिक संघटनांना देऊन त्यांचीही मते घेतली जावीत असं मतही त्यांनी व्यक्त केले.
ज्या महिलांवर सातत्याने हल्ले होत आहेत त्यांच्या केसचा तपशील वा केस तपासून महिलांना शस्त्र देता येतील का? तशी पीडित महिलेने मागणी केल्यास व कायद्याने योग्य असेल तर यावर कार्यवाही करण्याबाबत गृह विभागास निर्देश द्यावेत अशी सूचना गोऱ्हे यांनी केली.
Read Also :
‘त्या’ फेक अकाऊंट्सचे मालक कोण? हे जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी https://t.co/rb5qHCCOe3 @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020