पुणे: कांबळेश्वर गावचे जेष्ट मार्गदर्शक आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचे विश्वासू सहकारी कै. गजानन यशवंत खलाटे यांचे मोठे बंधू झुंबरराव यशवंतराव खलाटे (आण्णा) यांचे नुकतेच निधन झाले. ही बातमी कळताच देशाचे नेते आणि बारामतीचे तालुक्याचे भाग्यविधाते मा.कृषीमंत्री श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी खलाटे कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली.या भेटीत कुटुंबियांची भेट घेऊन जुन्या आठवणींना साहेबानी उजाळा दिला. जिवाभावाच्या अश्या सहकाऱ्यांनी साथ दिल्यामुळेच माझा इथपर्यंतचा राजकीय प्रवास यशस्वी झाला. त्यासाठी गावागावातील सहकाऱ्यांचे योगदान कायम स्मरणात राहील,’’ असे शरद पवार यावेळी म्हणाले.
त्या अनुषंगाने शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकांचा घेतलेला आढावा. १९६६ साली आक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभा निकोडनुकीचे वारे वाहू लागले होते. त्यावेळचे प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष यांनी शरद पवारांना विचारले की, बारामती मधून निवडणुकीची संधी मिळाली तर निवडणूक लढवशील का? आणि पवार साहेबांना संधी चालून आली. पुण्यात शिक्षणासाठी असताना त्यांनी बारामतीमधून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून संघटन बनवले होते. त्यात सातशे आठशे विद्यार्थी होते अन् ते पवार साहेबांच्या पाठीशी निर्विवादपणे वेळो वेळी उभा राहत असत.
त्याकाळी उमेवारीसाठी दिल्लीवारी करण्याची भानगड नव्हती, जे काही निर्णय व्हायचे ते प्रदेश पातळीवरच. अश्या परिस्थितीत बारामती विधानसभा मतदार संघासाठी विनायकराव पाटलांच्या सांगण्यावरून पवारांनी अर्ज भरला खरा, पण स्थानिक पातळीवरून त्याला कडाडून विरोध झाला. शरद पवार तरुण असल्याने एकदा का संधी मिळाली तर आपली सारी राजकीय दारे बंद होतील या भीतीने साऱ्याच स्थानिक नेत्यांनी पवार साहेबांची धास्ती घेतली. आमच्या पैकी कुणालाही उमेदवारी द्या पण शरदला नको अशी पूर्णपणे विरोधी भुमीका घेतली. तालुक्याच्या काँगेस कमिटीने एक विरुद्ध ११ असा ठराव प्रदेश काँग्रेस कडे केला. त्यांनतर झाले असे की, शरदला बारामती मधून विरोध खूप विरोध आहे, त्याला उमेदवारी दिली तर उमेदवार पडेल त्याला सोडून दुसऱ्या कोणालाही उमेदवारी द्या, असा थेट नकार पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीनेही प्रदेश काँग्रेसकडे पाठवला.
पवार साहेबांच्या उमेदवारीला होणारा विरोध पाहून हे प्रकरण काँग्रेस प्रदेशाच्या संसदीय बैठकीत चर्चेला गेलं. त्या वेळी ही बैठक यशवंतराव चव्हाण यांच्या निवास्थानी पार पडत असे. त्याकाळी इच्छुकांच्या मुलाखतीच्या आणि बैठक होत असत. मुलाखती झाल्यानंतर काँग्रेसचे संसदीय मंडळ जिल्ह्यातील नेत्यांशी विचार विनिमय करून त्यांचे मत जाणून घेत. बारामती मतदार संघाच्या उमेदवारीबाबत एकमत होत नव्हते. बाहेरचा उमेदवार द्यावा लागत असे. आधीच्या वेळी ही बारामतीच्या उमेदवाराबाबत एकमत न झाल्याने पुण्याच्या मालतीबाई शितोळे यांनी उमेदवारी द्यावी लागली होती याचा दाखल देत, स्थानिक उमेदवार बारामतीतून निवडून येत नाही हा युक्तिवाद करत, शरद नवखा आहे, आणि त्याला सगळ्यांचा विरोध त्याचा निवडणुकीत निभाव लागणार नाही. असा निर्वाणीच्या नकाराचा सूर स्थानिक नेत्यांनी लावला. तरीही यशवंतराव चव्हाण आणि विनायकराव पाटील यांनी पवार साहेबांच्या नवलच आग्रह धरला. पण पुणे जिल्ह्याचे नेते अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पवार साहेबांच्या नावाला आडकाठी सुरूच ठेवली.
पुणे जिल्ह्यातील नेते आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात धुमश्चक्री चालू होती. चव्हाण साहेबांनी विरोध करणाऱ्या एका नेत्याला अचानक विचारले, “महाराष्ट्रातील २७० जागांपैकी किती काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील?” त्या नेत्याने १९० ते २०० जागांवर काँग्रेस विजयी होईल. असं सांगितलं. चव्हाण साहेबांनी उलट प्रश्न केला, “म्हणजे ८० जागेवर आपले उमेदवार पराभूत होतील हे नक्की का?” त्या नेत्यांनी शक्यता असल्याचे सांगितले. यावर चव्हाण साहेब म्हणाले ठीक आहे, “मंग बारामतीची एक जागा गेली म्हणून समजा आणि शरदला उमेदवारी द्या”. असं बोलून शरद पवारांची बारामतीची उमेदवारी चव्हाण साहेबांमुळे पक्की झाली.
पवार साहेबाची उमेदवारी पक्की झाली खरी पण अनेक संकटे पुढे उभी राहिली, बारामती तालुक्यातील सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजिनामे दिले अन् शरद पवारांना पाडण्यासाठी एकजूट केली. पवारच्या विरोधात मोठे प्रस्थ बाबालाल काकडे यांना सर्व पक्षीय उमेदवार म्हणून केले. पण शिक्षणासाठी पुण्यात आलेले तरुण सहकारी पवारांच्या पाठीमागे उभा राहिला. या अगोदर पवार साहिबांनी बारामती तालुक्यात पाझर तलाव, नाले, रास्तही यांचे दुष्काळी कामात कामे केली होती. या कामातील मजूर ही पवारांच्या मागे उभे राहिले. तसेच राजकारणाबाहेरील वर्ग म्हणजेच व्यापारी, वकील,शिक्षक, एकोप्याने पवारच्या पाठी राहिला.
शेतात पिकणारा शेतमाल विक्रीसाठी आजूबाजूच्या गावात पवार साहेब घेऊन जात असल्याने त्या गावातील माणसेही बाजूने उभा राहिले, यशवंतराव चव्हाण यांनी बारामती मध्ये सभा घेतली तिला प्रचंड प्रमाणात तिला प्रचंड प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला. बाबालाल काकडे यांच्या पेक्षा दुप्पट मताची आघाडी घेऊन पवार साहेब निवडून आले.
(संदर्भ : लोक माझे सांगाती)