नाशिक : राज्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा मद्दा पुन्हा पेटला आहे. यातच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी पुन्हा व्हावी, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. याचाच भाग म्हणून नाशकात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा त्यांच्या घरापासून आंदोलनाला सुरूवात करू. असा इशाराच त्यांनी दिलाय.
राज्यातील आमदार-खासदारांनी तिथं जाऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांना त्यांच्या लेटरहेडवर हमी द्यावी. त्यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावे. राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आंतरवाली सराटीत बैठक घेऊन मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत ज्या मागण्या आहेत. त्या सोडवण्याचा पुढाकार घ्यावा. असेही करण गायकर यांनी म्हटलंय.
हेही वाचा..“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या,” अजितदादाच्या आमदाराची पत्राद्वारे मागणी
दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन आंदोलनासंदर्भात दाखवून हे आंदोलन स्थगित करावी. जर हे नेते त्या ठिकाणी गेले नाही तर पहिलं आंदोलन शरद पवारांच्या घरापासून या सर्व राजकीय नेत्यांच्या घरापासून केले जातील. या सर्वाचे जबाबदार हे नेतेच असतील. ४८ खासदार आणि आमदारांना मतदारसंघात सुखरूप फिरायचं असेल तर आंतरवाली सराटीत जाऊन आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करावा असं सकल मराठा समाज समन्वयक करण गायकर यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा..“हा भटकता आत्मा तुम्हाला आता सोडणार नाही”, शरद पवारांनी मोदींना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…“नाशकात कांद्याने आम्हाला रडवलं,” मोदींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी कबुली
हेही वाचा…“शरद पवार तुम्ही काँग्रेसच्या कुबड्यांवर आयुष्यभर राजकारण केल”