पुणे : बारामती लोकसभेच्या लढतीकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे बारामतीत दिवसेंदिवस राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात घडतांना दिसत आहेत. अशातच अजित पवारांनी पवार आडनाव असलेल्या व्यक्तीला मतदान करण्याचे आवाहन एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावर शरद पवारांनी बाहेरचे पवार आणि मुळचे पवार यांच्यामध्ये फरक असल्याचे सांगत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. या वक्तव्यावरून राज्यात मोठा गोंधळ उडाला असून शरद पवारांना मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी मोठं विधान केलंय.
शरद पवारांनी केलेले वक्तव्यावर पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना प्रश्न केला असता. त्यांना यावेळी अश्रु अनावर झाल्याचे दिसून आले. यावेळी त्या म्हणाल्या की, “माझी उमेदवारी ही जनतेची मागणी होती, त्यामुळे जिथे जाते तिथे मोठा पाठिंबा मिळतो” असं सांगितलं आहे.
सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या?
मतदारसंघातील लोकांमध्ये मोठा उत्साह असून जिथे जाईल तिथे लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर चालण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असेल तर योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचवयला मदत होते. त्यामुळे दोन्हीकडे एकच सरकार असणे गरजेचे आहे. बारामती मतदारसंघांमध्ये जो विकास झाला आहे, तशाच प्रकारचा विकास इतर तालुक्यांमध्ये देखील घडवायचा आहे. बारामतीमध्ये अनेक कंपन्या आहेत, महिलांना रोजगार मिळाला आहे. तसाच विकास मतदारसंघातील इतर ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे. माझी उमेदवारी ही जनतेची मागणी होती. त्यामुळे जिथे जाते तिथे मोठा पाठिंबा मिळतो आहे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“जर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते तर राम मंदिर उभंच राहिलं नसतं”, राज ठाकरेंकडून मोदींचं कौतूक
हेही वाचा…“राजकारण करणारे राजकारण करत राहतील परंतु आम्ही..” सुनील तटकरेंचं मोठं विधान
हेही वाचा…“आमच्या रक्तात राष्ट्रवादी, ह्यदयात भाजप तर हातात धनुष्यबाण”, मल्हार पाटलांचं मोठं विधान
हेही वाचा…ठरलं तर मग…! राम सातपुते की प्रणिती शिंदे लढतीत ‘या’ समाजाची मतं गेम चेंजर ठरणार