मुंबई : माजी खासदार निलेश राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाणार बाबत काही गंभीर आरोप केले. त्यावर आता शिवसेनेकडून उत्तर यायला सुरुवात झाली आहे. खासदार विनायक राऊत यांनी राणेंच्या आरोपाला उत्तर देत जोरदार हल्लाबोल केला आहे.
“माजी खासदार नीलेश राणे यांनी शुद्धीत बोलावं, कारण ते अनेकदा शुद्धीत बोलत नाही,” असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत नीलेश राणे यांनी शिवसेनेवर आरोप केले ते फेटाळत नाणार रिफायनरी होणार नसल्याची शिवसेनेची भूमिका ठाम आहे,” असे राऊत म्हणाले.
‘नाणारमधील बाधित जमिनींमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मावस भाऊ निशांत देशमुख याची 1400 एकर जमीन असून सुगी डेव्हलपर्स या नावानं या कंपनीनं हे व्यवहार केले आहेत’ , असा आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केले आहे. कोकणात नाणार तेल शुद्धीकरण कारखान्यावरून आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
‘नाणारमध्ये सुगी डेव्हलपर्स नावाची एक कंपनी असून निशांत देशमुख संचालकांपैकी एक आहेत. निशांत देशमुख मुख्यमंत्र्यांचा मावशीचा मुलगा आहे. त्याचा जवळपास १४०० एकर जमिनीचा व्यवहार झाला आहे. जमिनीच्या व्यवहारात मुख्यमंत्र्यांचाच नातेवाईक निघाला आणि युतीच्या काळात हे लोक मुखवटा घालून फिरत होते, लोकांना भडकवत होते. यांनी कुटुंबातील व्यक्ती जमिनीचा व्यवहार करत असताना यांनी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनं केली,” अशी टीका निलेश राणे यांनी केली होती.
Read Also
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020