आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मुले सज्ञान झाल्यानंतर कोणी कोणाशी लग्न करायचं ही कायद्यात तरतूद आहे. कायदा मोडून कोणी केराची टोपली दाखवू नये. वेगवेगळ्या राज्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे. काही ठिकाणी जाणून बुजून हे सर्व घडवून आणलं जात असल्याचा आरोप देखील आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केला आहे.
दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनची गरज भासू शकते, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात. मात्र, दुसऱ्या बाजूला शाळा सुरु केल्या जात आहेत. याबाबत बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, राज्य सरकारचं याबाबत कोणतंही नियोजन नाही. निर्बंध लावणार असाल तर शाळा का चालू केल्या, असा सवाल देखील त्यांनी थेट सरकारला केला आहे.
राज्य सरकारचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विवाहासाठी फसवणूक करून धर्मांतर केल्या जाणाऱ्या घटना थांबविण्यासाठी तयार केलेल्या कायद्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.