मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी साधलेल्या संवादाच्या वेळी, ‘१२ वी परीक्षेच्या दृष्टीनेही देशाचे राष्ट्रीय धोरण असावे, यासाठी हवे असल्यास मी पंतप्रधान यांच्याशी बोलेन, हवे असल्यास पत्र व्यवहार करेन, असं वक्तव्य केलं होतं, यावर , ‘उद्या वेळ आली तर मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे यांच्या लग्नसाठी मुलगी शोधा! असं पत्रही मुख्यमंत्र्यांना लिहितील,’ अश्या आशयाची टीका केली.
दरम्यान, याचा शिवसेनेकडून समाचार घेतला असून, मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी, ‘मुख्यमंत्र्यांवर असे वक्तव्य करून, आपला तोल पूर्णपणे ढळल्याचे चंद्रकांत पाटील दाखवून देत आहेत, ‘चंपा’चा तोल पूर्ण ढळला असून, “सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही” अशी त्यांची अवस्था झाल्याचे हे लक्षण आहे,’ अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी केली आहे.
तसेच, ‘भाजपचे सगळ्याच नेत्यांचे सत्तेचे स्वप्न तुटल्याने ते अस्वस्थ झाले आहेत आणि समाज माध्यमांसमोर येऊन काहीबाही बोलल्याशिवाय त्यांना बिलकुल चैन पडत नाही, त्यांना आपण राज्याच्या लोकप्रिय आणि जनमान्य मुख्यमत्र्यांवर इतकी पातळी सोडून टीका करत आहोत, याचे देखील या बिचाऱ्यांना भान राहिलेले नाही,’ अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.
Read Also :
- बारावी परीक्षेचा निर्णय घेण्याअगोदरच केंद्रिय शिक्षणमंत्र्याची प्रकृती खालावली; कोण घेणार निर्णय…
- कटकमिशनचे धंदे बंद करा! मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवरुन भाजपने केले शिवसेनेवर ४ गंभीर आरोप
- जळगांवात शिवसैनिकांनी अडवला देवेंद्र फडणवीसांचा ताफा… नंतर काय घडले
- भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘अच्छे दिन आने वाले है’
- ‘आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघा! म्हणूनसुद्धा मुख्यमंत्री पंतप्रधांनाना पत्र लिहितील’