मुंबई : मुख्यमंत्र्यांनी रविवारी त्यांच्या जनसंवादात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचा उल्लेख केला होता. हाच संदर्भ घेऊन आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
‘ठाकरे सरकार प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखवत, केंद्राकडे ढकलत आहे. असं असेल तर मुख्यमंत्री उद्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा पंतप्रधांनांनाच पत्र लिहतील,” असा जोरदार टोमणा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी, शरद पवारांची भेट, पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या हेतूनेच घेतली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी, पिंपरी-चिंचवडे आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नात मिरवणूक काढली, गर्दी जमवली आहे, हे चुकीचे आहे. त्यांना समाज देण्यात येईल, असे सांगत, समाज माध्यमांनी जसे त्यांच्या वाईट कृत्याचे दर्शन दिले, तसेच त्यांच्या या काळात केलेल्या समाजपयोगी कामांची देखील दखल घ्यावी, अशी सूचना देखील त्यांनी माध्यांना केली.
यावेळी, ‘आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती खासदार संभाजीराजे राजीनामा देणार आहेत, मात्र त्याने काहीही सध्या होणार नाही. हे सरकार कोडगं आहे. त्यांच्या राजीनाम्याने सरकारला काहीही वाटणार नाही,” असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
Read Also :
- अजित पवारांनी अविनाश मोहितेंना दिलेल्या शब्दामुळे दोन्ही मोहितेंचे मनोमिलन लांबणीवर
- ‘पुढच्या १०० वर्षांतसुद्धा राज्यात भाजप सत्तेत येऊ शकणार नाही!’
- शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेलं – संजय राऊत
- पदोन्नत्तीतील आरक्षणाबाबत नितीन राऊत म्हणतात…’तोडगा निघेल!’
- गोकुळच्या पहिल्याच बैठकीत जोरदार विरोध ; शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या सत्ताधिकाऱ्यांवर केली प्रश्नांची सरबत्ती