मुंबई : ठाकरे सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर काढला आणि महाविकास आघाडीत असलेले मतभेद चव्हाट्यावर आले. दरम्यान, या मतभेदांचा लाभ विरोधकांनी संधी म्हणून उठवण्याच्या आत ते मिटवण्याची कसरत आता ठाकरे सरकारकडून सुरु झाली आहे.
याबाबत, आधी काँग्रेसच्या मंत्र्यांनी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठाकरे यांची भेट घेऊन, या संदर्भातील काढलेला अध्यादेश मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर, आता आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काँग्रेसच्या मंत्र्यांची यांसंदर्भातील बैठक मुंबईमध्ये पार पडली.
यावेळी, या मुद्यावर काँग्रेस नाराज असून, तातडीने सरकारने यासंदर्भातील काढलेला अध्यादेश रद्द करावा, अशी आग्रही मागणी या बैठीकीला उपस्थित असलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, केसी पाडवी यांनी केली आहे.
पदोन्नती आरक्षणासंदर्भात आज मंत्रालयात सन्माननीय सर्वश्री ना. @ChhaganCBhujbal साहेब, ना. @bb_thorat, ना. @Jayant_R_Patil, ना. @NitinRaut_INC, ना. @ikcpadavi आणि ना. सौ. @VarshaEGaikwad या मंत्रिमंडळातील सहकार्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. pic.twitter.com/HFEw8CYJ80
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 1, 2021
यासंदर्भातील अधिक माहिती बैठकीनंतर, नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. “सरकार कायदेशीर आणि प्रशासकीय बाजूंचा अभ्यास करेल आणि मग नक्कीच सकारात्मक निर्णय होईल,” असं ते म्हणाले. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधित अहवाल कायदा आणि न्याय विभागाकडे पाठवून दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या वादावर याआधी देखील नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, आमच्यातल्या या वादाचा सरकारला कोणताही धोका नाही, हे सरकार ५ वर्ष चालेल, हा वाद चर्चेतून सोडवला जाईल. मात्र, सरकारने हे आरक्षण रद्द करणे, म्हणजे मागासवर्गीयांचा विश्वासघात करण्यासारखे आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
Read Also :
- कृष्णा काठी सर्व उमेदवार झाले निश्चित; रयत आणि संस्थापक पॅनलचे मनोमिलन मात्र बारगळले
- ओबीसी आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे ढकलून ठाकरे सरकार आम्हाला मुर्ख समजतयं का?
- काल पवारांच्या निवासस्थानी, आज खडसेंच्या घरी; राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप?
- मराठा तरुणाचा जाळून घेण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
- तोच प्रश्न मलाही पडलाय, नेमकं काय चाललंय? चंद्रकांत पाटलांची सूचक प्रतिक्रिया