मुंबई : राज्यात गेल्या ६ महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीमुळे लवकरच सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची नाव गंटागळ्या खात बुडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या विधानसभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अचानक भेट घेतल्याने राज्यात राजकीय चर्चांना तुफानी लाटांसारखे उधाण आले.
दरम्यान, त्यांच्या या भेटीवर अनेक पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आपापली मते माध्यमांसमोर मांडली. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही आज या घटनेवर आपले मत प्रसार माध्यमांसमोर मांडले असून, “आघाडी सरकारला कशा प्रकारचं सहकार्य विरोधी पक्षाने करण्याची गरज आहे, याचे मार्गदर्शन शरद पवारांनी फडणवीसांना केलं असेल,” अशी उपरोधात्मक टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे.
तसेच, “पवारांनी त्यांना नक्कीच सत्तेचा मंत्र दिला असेल. सध्या विरोधी पक्ष ज्याप्रकारे राज्यात गोंधळ निर्माण करून, सरकारच्या कामात अडथळे तयार करत आहे, हे असंच सुरु राहिलं तर, पुढच्या १०० वर्षांतसुद्धा राज्यात भाजप सत्तेत येऊ शकणार नाही! हेच पवारांनी सांगितलं असेल,” अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
Read Also :
- काल पवारांच्या निवासस्थानी, आज खडसेंच्या घरी; राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप?
- मराठा तरुणाचा जाळून घेण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
- तोच प्रश्न मलाही पडलाय, नेमकं काय चाललंय? चंद्रकांत पाटलांची सूचक प्रतिक्रिया
- शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेलं – संजय राऊत
- ओबीसी आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे ढकलून ठाकरे सरकार आम्हाला मुर्ख समजतयं का?