मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीला अजून जवळपास ९ महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. मात्र, त्याआधीपासूनच मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापायला लागलं असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुका सध्याचा काळ पाहता, पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि यावरून भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपलेली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला असून, मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी, ‘मुदतपूर्व निवडणुका, निवडणुका पुढं ढकलण्यासाठी महामारीचा बहाणा, २०११ च्या जनगणनेवर आधारित नवी प्रभाग रचना, ३० प्रभाग फोडण्याचा प्रयत्न, असे शिवसेनेचे डाव आहेत. मात्र, आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही,’ असा इशारा दिला आहे.
‘महापालिका निवडणुकीला घेऊन शिवसेना कटकारस्थान करण्यात गुंतली आहे. मात्र, यावर भाजपचं संपूर्ण लक्ष आहे. सेनेने निवडणूक आयोगाच्या आडून राजकारण करू नये. गेल्या दीड वर्षांत शिवसेनेने अनेक कट रचले. पहिल्या लाटेत मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला, मात्र महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे तो फसला, नंतर दुसरा डाव टाकून महापालिकेची प्रभाग रचना भाजपपूरक असल्याचा आरोप केला, त्यातही त्यांना यश आले नाही आणि आता हा तिसरा,’ असा गंभीर आरोप त्यांनी शिवसेनेवर केला आहे.
‘मुंबई असे ३० वॉर्ड आहेत, जे शिवसेना व काँग्रेसला कधीच जिंकता येणं शक्य नाही. त्यामुळे तिथे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, असं सांगत त्यांनी, ‘बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है’, या शब्दांत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
तसेच, ७० कोटी खर्चून केलेली नालेसफाई ही आभासी आहे. सेनेने “मुंबई तुंबू देणार नाही” असा शब्द दिला होता. आता पळून जाऊ नका. ५ लाख मॅट्रिक टन गाळ काढलात असं म्हणता, तर तो टाकला कुठे?, ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल तर आमहाला त्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ ज्या काट्यावर मोजला, त्याच्या पावत्या दाखवा, असं आव्हान देत त्यांनी, नालेसफाईतही कटकमिशन सुरू असल्याचा आरोप केला आहे.
Read Also :
- जळगांवात शिवसैनिकांनी अडवला देवेंद्र फडणवीसांचा ताफा… नंतर काय घडले
- भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘अच्छे दिन आने वाले है’
- ‘आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघा! म्हणूनसुद्धा मुख्यमंत्री पंतप्रधांनाना पत्र लिहितील’
- ‘पुढच्या १०० वर्षांतसुद्धा राज्यात भाजप सत्तेत येऊ शकणार नाही!’
- लांडगेंना समर्थन नाही, पण कोरोनाकाळातील चांगले काम एकदा मीडियाने दाखवावं; चंद्रकांत पाटलांनी टोचले कान