मुंबई : खासदार संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर. चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते”.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील अशी परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राजभवनात जाऊन सांगावं लागेल असा टोला लगावला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दलही खुलासा केला. ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले होते नेमकं चंद्रकांतदादा
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य केलं. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
Read Also
नव्या कृषी कायद्यांना काँग्रेस खासदाराचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान
https://t.co/ff7wZ5kOkr#Congress #KisanBill2020
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 29, 2020