मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला होता. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रात जात महत्त्वाचा विषय कधीच राहिलेला नाही असं म्हटलं आहे. तसंच ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर खापर फोडलं जात आहे असं आपल्याला वाटत नसल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. एका वृत्तवाहिनीनिशी बोलताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं की, “मला असं वाटत नाही. महाराष्ट्रात दलित, मुस्लिम मुख्यमंत्री झालेले आहेत. महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री द्यायचं कार्य, धाडस बाळासाहेब ठाकरेंनी दाखवलं होतं. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. एक ब्राह्मण जे चार वर्षांपेक्षा जास्त काळ राहिले आणि दुसरा मराठा मुख्यमंत्री. महाराष्ट्रात जात महत्त्वाचा विषय कधीच राहिलेला नाही.
काय म्हणाले होते फडणवीस नेमकं ?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना फडणवीस यांनी एक महत्वाचं विधान केलं होत. ते म्हणाले होते दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read Also
मनसे चित्रपट सेनेची राज्यव्यापी आढावा बैठक पुण्यात उत्साहात संपन्नhttps://t.co/HZMhoj1Hqw#MNS #RajThackeray #AmeyKhopkar #MNSChitrpatsena@MNSAmeyaKhopkar @RajThackeray
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 18, 2020