5 ऑगस्टला अयोध्यामध्ये पार पडणाऱ्या राममंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनेक वाद देखील सुरू झाले आहे. शिवसेने देखील या कार्यक्रमावरून भाजपवर निशाणा साधला आहे. राम मंदिर आंदोलनातले आम्ही स्वातंत्र्यसैनिक आहोत, पण योगदान मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
कार्यक्रमाच्या आमंत्रणाविषयी ते म्हणाले की, आतापर्यंत तरी आमंत्रण आलेले नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नंतर झाले पण ते अगोदर शिवसेनाप्रमुख आहेत. तसेच, कोरोनाच्या स्थितीमध्ये प्रमुख लोकांनी जाणे टाळावे, असेही ते म्हणाले.
एका प्रश्नाचे उत्तर देताना राऊत म्हणाले की, लढ्यातलं योगदान मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. जेव्हा भलेभले ‘आम्ही बाबरी पाडली नाही, शिवसेनेने केले’ असे म्हणत पळून जात होते, तेव्हा आम्ही ठामपणे उभे राहिलो.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले की, यावरून राजकारण सुरू आहे ते निर्लज्जपणाचा कळस आहे.