रायगड: किल्ले रायकडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती Chhatrapati Sambhajiraje जातीने या तयारीकडे लक्ष देऊन आहेत. त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण, मराठा मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी रायगडावर महत्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतू गेल्यावर्षापासून कोरोनाच्या सावटामुळं शिवप्रेमी रायगडावर पोहोचू शकत नसल्याचे चित्र आहे. यंदाचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन टेपला असल्याने सोहळ्याच्या तयारीला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती खा. संभाजी राजे भोसले यांनी शिवराज्याभिषेक सोहळा समिती रायगडच्या अध्यक्षपदी शुभम राजे माने यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदि गणेश कदम यांची निवड करण्यात आली आहे.
६ जुन रोजी शिवराज्याभिषेक सोहळा दिवस साजरा केला जातो. ६ जुनला दिवशी १६७४ला किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. हा सोहळा तब्बल ९ दिवस सुरू होता. शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान. शिवरायांच्या या स्वराज्याला अनेक जण हिंदू पदपादशाही म्हणूनही संबोधतात. ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं. त्या काळात आणि त्याच्या आधी निजमशाही, अदिल शाही, मोगल, फारुखी सल्तनत, बरिदशाही, तुघलक, खिलजी, बहामनी, इमादशाही, कुतुबशाही आणि या व्यतिरिक्त लोधी, सिद्धी, पोर्तुगिज आणि इंग्रज या परकीय आक्रमकांनी देशाच्या स्वातंत्र्यसूर्याला ग्रासलं होतं.
अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं ही साधी गोष्ट नव्हती. म्हणून ६ जुन दिवस महत्त्वाचा. २०२१चा शिवराज्याभिषेक सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन टेपला असल्याने शिवप्रेमी जय्यत तयारीला लागले चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा समिती रायगडच्या अध्यक्षपदी शुभम राजे माने तर उपाध्यक्ष पदि गणेश कदम यांची निवड करण्यात आली आहे.
कोण आहेत शुभम राजे माने?
शुभम राजे माने हे मुळचे सातारा जिल्ह्यातील वाई गावचे आहेत. हे शिवाजी महाराजांचे अतिशय जवळचे सेवक हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वंशज आहेत. ते आता अकोले तालुका जिल्हा अहमदनगर येथे राहत आहेत. शुभम राजे माने यांनी खा छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे खंदे समर्थक म्हणुन काम करत आहेत तसेच मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणून काम करत आहेत त्याचप्रमाणे आपल्या मुखातून ते किर्तन प्रवचनच्या माध्यमातून समाजाची सेवा करत आहेत.