मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, असं त्यांनी म्हटलं… कालच्या विधिमंडळ अधिवेशनात नानांनी पाळत ठेवल्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला… महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप झाले… त्यात नाना पटोले देखील होते. पण नानांचा फोन का टॅप झालेला असावा याचा अंदाज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लावला आहे. आजच्या सामना अग्रलेखामधून राऊतांनी नानांचं मोठेपण सांगत तत्कालिन फडणवीस सरकारला नानांपासून धोका आहे, असं वाटलं असेल म्हणून त्यांचा फोन टॅप केला गेला असेल, असं म्हटलंय
हे पण वाचा: पंकजा मुंडे नाराज नाहीत, राजीनामे न देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन – चंद्रशेखर बावनकुळे
हे पण वाचा: मला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी संपले नाही; पंकजा मुंडे कडाडल्या
फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी लागली आहे. सरकार एखाद्याचे फोन ‘टॅप’ करीत असेल म्हणजे एक तर तो देशविघातक कारवायांत सहभागी असायला हवा, नाही तर त्या व्यक्तीपासून सरकारला धोका आहे, असे समजायला हवे. नाना दुसऱ्या प्रकारात मोडतात. नानांमुळे सरकार पडेल किंवा नवे सरकार येईल, असे पोलीस खात्यातील फडणवीसांच्या अंधभक्तांना तेव्हा वाटले असेल. त्यातून नानांचे फोन चोरून ऐकण्यात आले, असा अंदाज राऊतांनी लावला आहे.
हे पण वाचा: पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; भाजप नेते राम शिंदे म्हणतात….
सरकार अस्थिर करण्यासाठी महापूजा, त्यातला महाप्रसाद म्हणजे नानांचे फोन
नाना पटोले यांचे फोन चोरून ऐकले जात आहेत तसे ते अनेकांचे ऐकले जात असावेत. महाराष्ट्रातले सरकार दिल्लीश्वरांच्या डोळ्यांत खुपत आहे. मनात सलते आहे. हे सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्राने जी महापूजा मांडली आहे त्यातला तीर्थप्रसाद म्हणजे नानासारख्यांचे फोन ऐकणे. त्यांच्यावर हेरगिरी करणे. नाना त्यामुळे जास्तच उसळून उठले. नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे. मनास येईल ते दाणकन बोलतो. नानांच्या रांगड्या बोलीचे महाराष्ट्राला कौतुक आहे.