वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कल्याण पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम अखेर २६ महिन्यानंतर पूर्ण झाले. मात्र हा पत्रीपूल उभारणं साधं काम नव्हतं मात्र हे शिवधनुष्य मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने पेललं ते खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी.
कल्याण डोंबिवली करांचा श्वास कोंडला
मुंबईत झालेल्या एका मोठ्या दुर्घटनेनंतर रेल्वेने अनेक धोकादायक पुलांचे ऑडिट केले त्यात पत्री पुलाचा देखील समावेश होता. ब्रिटिशकालीन पत्रीपुलावर १८ नोव्हेबर २०१८ ला रेल्वेकडून हातोडा मारण्यात आला. तेव्हापासून नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. रस्ते विकास महामंडळाकडून ३६ कोटी रुपयांच्या निधीतून नवा ११० मीटर लांबीचा पत्रीपूल तयार करण्यात आला असून कमीत कमी वेळेत हा पूल पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरांतून ठेकेदारावर दबाव येत असल्याने दिवसरात्र काम करून या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले.अनेक अडथळ्यांची शर्यंत पार करत अखेर या पत्री पुलाने पूर्णत्वाचा एक मोठा टप्पा ओलांडला आहे.
एमएसआरडीसीकडे रस्ते आणि पूल उभारण्याचा दांडगा अनुभव असल्यामुळे पत्रीपूल उभारणीचे काम देखील एमएसआरडीसी त्यांच्याकडचे देण्यात आले.डिसेंबर २०१८ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करत पूल उभारणीचा श्री गणेशा करण्यात आला.
अशी होती अडथळ्यांची शर्यत
पूल बांधकामावेळी खोदकामादरम्यान जमिनीखाली ब्रिटिश कालीन मोठी गटारे आढळून आली. त्यामुळे गटार न तोडता पूल उभारणीसाठीची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.नवीन नकाशे बनवून पुन्हा एकदा मंजुरीसाठी पाठवण्यात आले अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पुलाच्या बांधकामाला उशीर होत होता.
गर्डरची निर्मिती
रेल्वेच्या नियमानुसार गर्डरच्या निर्मितीचे काम हैद्राबादमधील अनुभवी ग्लोबल स्टील या कंपनीला देण्यात आले. यासाठी कालावधी देखील मोठा लागणार होता. मात्र पुलाचे अर्ध्याहून अधिक काम म्हणजे सुमारे ६० % काम बाहेरच वर्कशॉपमध्ये पूर्ण होणार होत. त्यामुळे ग्राऊंड लेवल वरती पुलाचे काम सुरु नाही असे जनतेला वाटणे अत्यंत स्वाभाविक होते.
गर्डर बनून तयार झाला त्याची यशस्वी चाचणी देखील हैद्राबाद येथेच घेण्यात आली मात्र त्याला मूळ जागेवर आणल्यावर बसवण्यासाठी ज्या जागेवर आणण्यात आले त्या जागी सुमारे पाचशे कुटुंब असलेली एक चंद्रसुरभी सोसायटी होती. पूल निर्मितीच्या कामाचा त्यांना कोणताही त्रास होणार नाही याचा विश्वास देऊन काम पुढे सुरु करण्यात आले.
पुलाच्या कामासाठी खासदार शिंदे यांनी लोकडाऊनमध्ये केलेल्या कामाला यश
२२ मार्च पासून कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यावेळी देशात मोठं मोठ्या उद्योगांसह अनेक गोष्टी बंद होत्या. सर्व कामगार आपापल्या गावाला परतलेले होते. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी खासदार श्रीकांत शिंदे एका विशेष विमानाची परवानगी मिळवून कामगारांना पश्चिम बंगालवरून मुंबईत आणले. कामादरम्यान कोणालाही कोरोनाची लागण होऊ नहे यासाठी विशेष काळजी यावेळी घेण्यात आली आणि गार्डरच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली.
विरोधकांकडून जनतेची दिशाभूल
पुलाचे काम मंजूर होऊन मोठा कालावधी उलटून गेला होता त्यामुळे विरोधकांनी प्रत्यक्षात काम दिसत नसल्याने टीका करायला सुरुवात केली होती. प्रत्येक्षात काम दिसत नसले तरी हैद्राबाद येथे वर्कशॉपमध्ये या पुलाचे काम जोरदार पद्धतीने सुरु होते. याच मुद्द्यावरून अनेकांनी टीका करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आणि जनतेची दिशाभूल देखील केली. मात्र त्याकडे लक्ष न देता खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला काम पूर्णत्वास कसे नेता येईल याकडेच पूर्ण लक्ष दिले.
गर्डरचा तो ७२ तासांचा प्रवास
२१ आणि २२ नीव्हेबर रोजी रेल्वेने गर्डर बसवण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला परवानगी देत मेगाब्लॉकची घोषणा केली.
जुन्या पुलाला आई इसाई देवीचे नाव असल्या कारणामुळे महत्वाच्या कामाआधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी इसाई देवीचे दर्शन घेतले.
सकाळी १०.३० वाजता मेगाब्लॉकला सुरुवात झाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्यसह रेल्वे आणि इतर विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांसह कामाला सुरुवात झाली.
गर्डर जॅकच्या सहाय्याने वर उचलून त्याखाली रोलर लावण्यात आला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे देखील गर्डर लॉंचच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. गर्डर मध्यापर्यंत आला मात्र हा प्रवास सर्वांचे श्वास रोखून धरणारा होता.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी अडथळ्यामधे देखील कसली कंबर
दुसऱ्या दिवशीच्या कामाला सुरुवात झाली त्यावेळी काहीश्या प्रमाणात गर्डरची दिशा बदलली आणि अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले. गर्डर तसाच लटकत कसा ठेवणार ? कामासाठी पुन्हा मेगाब्लॉक मिळणार का ? असे अनेक प्रश्न उभे राहिले. मात्र अभियंत्यांनी सगळी कसरत पणाला लावत सरकलेला गर्डर पुन्हा सरळ केला. खासदारांच्या कार्यक्षमतेने सर्व यंत्रणेने सहकार्य दाखवत काम पूर्ण करण्यासाठी रात्रीचा पुन्हा एकदा मेगाब्लॉक मंजूर केला.
विरोधक टीकाकार साखर झोपेत आणि खासदार शिंदे मात्र पाय रोवून फिल्डवर
गर्डरचे काम पूर्णत्वाचा नेण्यासाठी खासदार शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडून रात्रीचा मेगाब्लॉक मिळवला वेळ होती रात्री १.३० ते ३ पर्यंतची. सर्व विरोधक आणि टीकाकार गाढ साखर झोपेत होते त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे मात्र जनतेसाठी कंबर कसून प्रशासनासोबत मध्यरात्री फिल्डवर होते.
गर्डर पुढे सरकू लागला मात्र अडथळे वाढतच होते महत्वाची असलेली लोखंडी बेंच निखळली आणि सगळं शांत झालं. तो ठीक होण्यासाठी सुमारे अर्धा तास गेला सर्व कामगारांनी अक्षरशः श्वास रोखून धरला होता. गर्डर पुढे सरकत होता आणि इतक्यात पुढे सरकणारा रोलर्स फुटला कामगारांनी तो देखील युद्ध पातळीवर दुरुस्त केला. आणि गर्डर पुन्हा पुढे सरकू लागला.
सर्वांच्या प्रयत्नानंतर पहाटे ५. ३० च्या सुमारास गर्डर लॉंच झाला ७६ मीटरचा ७२ तासांचा हा प्रवास थरारक होता. टीकाकारांना टीका करता यावी इतका सोपा तर तो नक्कीच नव्हता. पहाटे आकाशात आतिशबाझी झाली यावेळी कामगार,रेल्वे खाते,एम.एस.आर.डीसी या सर्वांच्या एकत्रित मेहनतीला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे या युवा नेत्याच्या प्रयत्नांनी यश आले होते. टीकाकार सगळे झोपेत असताना हा युवा नेता कल्याण डोंबिवली करांसाठी स्वतः मैदानात उतरून अनेक अडथळे पार करण्यासाठी पाय रोवून उभा होता.